फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही - राणें

बीड - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही, अशी बोचरी टिका नारायण राणे यानी केलीय, लातूर उस्मानाबाद जिल्ह्याच्या नंतर आज ते बीड जिल्ह्याच्या दुष्काळी दौरा पाहणी केली, मुर्शदपुर, औरंगपुर, लिंबारुई आणि खालापुरी गावांना भेटी देवून त्यानी शेतक-यांशी संवाद साधला, यावेळी शेतक-यानी राणे यांना पिण्याचे पुरवठा होत असलेले दूषित पाणी दाखवित पाण्याअभावी पिकांचे झालेले हाल दाखविले शिवाय राणे यांना रुमनं देवून सरकारचा निषेध केला, देवेंद्र फडणवीस हे धनदांडग्यांचे मुख्यमंत्री असून आठ दिवसात दुष्काळी उपाययोजना केल्या नाहीत तर, सरकारी कार्यालयाना टाळे ठोकणार असल्याचे सांगत मराठवाड्यात कोणत्याही मंत्र्यांना फिरू देणार नाही असा सज्जड दम नारायण राणें यानी यावेळी सरकारला दिलाय,,,,! 

बीड: मुख्यमंत्री देवेंद्र फ़ड़वनीसांचं सरकार आरएसएसचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात जो पर्यंत सरकार आहे तोपर्यंत तरी मराठा समाजला आरक्षण मिळणार नाही असा निर्वाळा नारायण राणे यांनी मराठा आरक्षणावर बीड मध्ये दिला, मी ज्यावेळी या समितीच्या अध्यक्षपदी होतो, त्यावेळी सगळ्या तांत्रिक बाबींचा अभ्यास करुन आरक्षणासंदर्भात योग्य ती कार्रवाई केली होती, मात्र सरकारने कोर्टामध्ये आरक्षण टिकण्यासंदर्भात योग्य पाठपुरावा केला नाही, जसे गुजरात मध्ये हार्दिक पटेलांच्या मागे पटेल समाज उभा राहिला तसं महाराष्ट्रात मराठा समाजानी एकत्रित यावे असे आवाहन नारायण राणे यानी यावेळी केले 

Share on Google Plus

About

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment