मुंबई : एका २० वर्षीय विद्यार्थ्याने पवई आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये चाकून भोकसून आत्महत्या केली. आयआयटीमधील प्राध्यापकांचा मृत विद्यार्थी दत्तक मुलगा होता. या तरुणाने पालक आणि बहिणीसोबतच्या वादानंतर चाकूने भोसकून आयुष्य संपवले.
त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे भांडण सुरु झाल्यानंतर तू आता मोठा झाला आहेस आणि पालकांची काळजी घ्यायला हवी, असे त्याची बहिण समजावत होती. मात्र यामुळे विद्यार्थ्याला प्रचंड राग आला. तो त्याच्या रुममध्ये गेला आणि छातीत चाकू भोसकला, अशी माहिती पवई पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बी के मधेश्वर यांनी दिली. पालकांशी आणि विवाहित बहिणीशी चर्चा केल्यानंतर पवई पोलिसांनी अपघातील मृत्यूची नोंद केली आहे.
0 comments:
Post a Comment